उर्जा संवर्धन करताना सर्वात महत्वाची काळजी
* चार दशकानंतर गुरुजींची भेट * मे महिन्याच्या सुट्टीमध्ये फेसबुकच्या भिंतीवर एक कविता झळकली. कविता वाचत असताना ती अत्यंत ओळखीची व जवळची वाटली. मी गुणगुणत एका दमात वाचून काढली लहानपणी ही कविता खूपदा तालासुरात गायली असे वाटत गेले. कवितेच्या शेवटी कवीचे नाव होते *कविवर्य उत्तम कोळगावकर* कविता संग्रह *छप्पापाणी* ती कविता म्हणजे गजबपूरचा अजब राजा त्याने केली काय मजा लोकांना म्हणाला, "नाचा खूप बसू नका कोणी चूप नाचता नाचता गाणं गा गाता गाता पेढे खा पेढे खाऊन हसा हसा खुशीत सगळे दिसा दिसा!" अजब राजाची गजब बात त्याने केले कायदे सात त्यातला होता एक असा प्रत्येकाने पाळावा ससा! पुन्हा एकदा गुणगुणत कविता म्हटली लगेच शेअर केली. हे करत असताना मन चाळीस वर्ष मागे गेलं 1979 - 80 साली वडिलांची बदली जळगाव जिल्ह्यातील रिंगणगाव वरून धरणगावला झाली. त्यावेळी मी आठवीत होतो इंग्रजीच्या पहिल्या तासाला काहीच कळत नव्हतं. याचं कारण रिंगणगाव ला असताना पाचवी ते सातवी आम्हाला इंग्रजी नव्हतं. याचे कारण म्हणजे, शिकवा...