* चार दशकानंतर गुरुजींची भेट * मे महिन्याच्या सुट्टीमध्ये फेसबुकच्या भिंतीवर एक कविता झळकली. कविता वाचत असताना ती अत्यंत ओळखीची व जवळची वाटली. मी गुणगुणत एका दमात वाचून काढली लहानपणी ही कविता खूपदा तालासुरात गायली असे वाटत गेले. कवितेच्या शेवटी कवीचे नाव होते *कविवर्य उत्तम कोळगावकर* कविता संग्रह *छप्पापाणी* ती कविता म्हणजे गजबपूरचा अजब राजा त्याने केली काय मजा लोकांना म्हणाला, "नाचा खूप बसू नका कोणी चूप नाचता नाचता गाणं गा गाता गाता पेढे खा पेढे खाऊन हसा हसा खुशीत सगळे दिसा दिसा!" अजब राजाची गजब बात त्याने केले कायदे सात त्यातला होता एक असा प्रत्येकाने पाळावा ससा! पुन्हा एकदा गुणगुणत कविता म्हटली लगेच शेअर केली. हे करत असताना मन चाळीस वर्ष मागे गेलं 1979 - 80 साली वडिलांची बदली जळगाव जिल्ह्यातील रिंगणगाव वरून धरणगावला झाली. त्यावेळी मी आठवीत होतो इंग्रजीच्या पहिल्या तासाला काहीच कळत नव्हतं. याचं कारण रिंगणगाव ला असताना पाचवी ते सातवी आम्हाला इंग्रजी नव्हतं. याचे कारण म्हणजे, शिकवा...
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
*Adjustment जगण्याची* माणूस मेला की त्याची बॉडी होते बॉडी आली का? घाई करा फुगेल, फुटेल, आंघोळ घाला उरका, सगळ्या adjustment मैताच्या वेळेस बघायला मिळतात, जसे नवा कपडा नाही, आरं चालतंय धडुक आण, साजूक तूप नाही ok डालडा तोही नाही रॉकेल चालत, चंदन कसलं मिळतंय कसलीही लाकडं चालतात तीही मिळाली नाही तर नुसत्या गोवऱ्यात भागवता येत, गुजरात भूकंपानंतर टायर मध्ये प्रेत जाळली होती आम्ही, हा तर ऍडजस्ट चा कळस ठरावा, सोन्याचा मणी नाही घशात घालायला विडयाच पान चालत नसल्यास तुळशीचं पान आहेच की इथे सगळ्याला पर्याय उपलब्ध असतात, कारण मेलेल्याची आकड नसते आधीच त्याची आकडी वळलेली असते, हे सगळं माहीत असूनही जिवंतपणी आपण मला असाच लागत अगदी ताटात लिंबू फोड इकडं तिकडं झालेली चालत नाही, change is the only constant thing in life पण system रन होताना थोडाही बदल सहन करायचा नाही अगदि चाकोरीत झापड लावूनच जगायचं, माणूस मेला की नाही हे चेक करण्याच्या पद्धती नव्हत्या त्या काळात, बघा गंमत येईल वाचताना प्रेताला आंघोळ गरम पाण्याने घालायच...