*सर काय वाचू,?*
असे अनेकजण विचारतात, मी मात्र काय वाट्टेल ते वाचा, ज्यात मन रमतय ते वाचा! असे सांगत असतो अगदी बाबा कदम किंवा बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबरीपासून सुरुवात करून कुसुमाग्रजांच्या विशाखा पासुन, लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे, शेतकऱ्याचा आसुड, काव्य फुले, काळे पाणी , समग्र काका , भालचंद्र नेमाडे लिखीत *हिंदू एक जगण्याची अडगळ* पर्यंत काहीही वाचावे,
कुठलेही लिखाण वर्ज्य असता कामा नये, कप्तान बेलवळकरांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या पासून श्रीमान योगी, मृत्युन्जय , जिप्सी, ययाती, छावा , युगंधर, काळेपाणी , बुद्ध व त्याचा धम्म, समग्र फुले, उचल्या, झोंबी, अक्करमाशी, बलुतं, मूकनायक, निळी पहाट, समग्र पुलं, समग्र वपु, दमा, धनंजय कीरांनी लिहलेली सगळी चरित्र, गोनिदांच बये दार उघड, माचीवरचा बुधा, या लिखानापासून महेंद्र कदमाच्या आगळ सारख्या किंवा महादेव वाळुंजच्या माझ्या हिरकणी या नव्या कादंबरी पर्यंत काहीही कुठेही वाचावे,
पुपुल जयकर किन्वा अशोक जैन यांच्या अनुवादाने तर साहित्य समृद्ध झालेय, अंतिम पर्व पासून गॉडफादर, गॉड ऑफ स्मॉल ' थिग्ज, अग्नीपंख असे सर्व काहीही,
राजन खान, डॉ गद्रे, भारत सासणे, सदानंद मोरे, रामदास फुटाणे, फमु, नरेंद्र जाधव, हरी नरके, राजा दीक्षित, .........काहीच वर्ज असता कामा नये
*दिसामाजी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडीत वाचीत जावे*
भाषा दिनाच्या शुभेच्छा
संजय चाकणे
9890171857